15/11/2024
🙏 नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो आज मी माझ्या कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी हा संदेश लिहिलेला नाहीये. जी गोष्ट कित्येक दिवस बघतोय, ऐकतोय त्याच्या बदल थोडंसं बोलावंसं वाटतंय म्हणून आज आपल्याशी संवाद साधत आहे. काही चुकले तर माफ करा. आपणच म्हणतो मराठी माणूस व्यवसाय करत नाही, मराठी माणसाला काम करायला नको, मेहनत करायला नको, मराठी माणूस आळशी आहे. पण खरं बघायला गेलं तर आपण किती जण आपल्या मराठी माणसाने व्यवसाय सुरू केल्यावर त्याच्या कडून वस्तू खरेदी केल्या? ज्या आपल्या रोजच्या वापरातील वस्तू आहेत ज्या तुम्ही दुकानात जाऊन किंवा आँनलाईन विकत घेता त्याच वस्तू त्याच किमतीत तुम्हाला घरपोच मोफत सेवा देऊन मिळत असतील तरी आपण का घेत नाही आपल्या माणसानं कडून? तीचं परभाषिक लोक कोणतीही पैशाची घासाघीस न करता आपल्या मराठी माणसानं कडून वस्तू खरेदी करतात आनंदाने. तेच आँनलाईन, मॉल, शोरुम, दुकानात जाऊन न भाव करता त्या वस्तू वर असलेल्या किंमतीत विकत घेता ना ? तसंच आपण मराठी भाषेचा अभिमान बाळगतो ना मग आपल्याच माणसांन कडून वस्तू खरेदी करताना कुठे जातो आपला अभिमान? का आपल कर्तव्य नाही का आपल्या मराठी माणसाला वरती आणं ? आपल्या महाराजांनी दिलेली शिकवण इतक्यात विसरलो आपण? आपल्या मराठी माणसाने दुकानं सुरु केले तर आपण त्याच्या दुकानाच्या ओपनिंगला काय घेऊन जातो पुष्पगुच्छ, देवी देवतांची मुर्ती फेरम ईतर ही काही भेट वस्तू. त्यापेक्षा आपण त्याच्या दुकानातील वस्तू का नाही खरेदी करत? तेवढीच सुरवातीला काही पैशाची मदत नाही का होणार त्यांना? फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर गरज नसताना ही नको त्या गोष्टींवर लाईक, शेअर आणि कमेंट करतो तीच आपल्या माणसाने व्यवसायाची जाहिरात केली तर किती जण आपन त्या पोस्टला लाईक, शेअर आणि कमेंट करता? इतकं तरी आपण नक्की करू शकतो ना? आपल्याला नाही का वाटत आपन कुठे तरी आपल्यात थोडंसं हा चांगला बदल घडवायला हवा आपणच आपल्या माणसाला मदत नाही करणार तर कोण करणार ? आपल्याला जर आपली अस्मिता टिकवायची असेल तर आज आपण एकत्र येऊन शपथ घेऊ आपल्या मराठी माणसाला साथ देऊ. आपल्या दैनंदिन जीवनात वापरात येणाऱ्या जीवना आवश्यक वस्तू या आपल्या मराठी माणसानं कडूनच खरेदी करू. जिथे जिथे आपल्या मराठी माणसाच्या व्यवसायाची जाहिरात दिसेल तिथे लाईक शेअर आणि कमेंट नक्की करू...
जय हिंद! जय महाराष्ट्र !
आपला शुभचिंतक...